अटल पेन्शन योजना काय आहे:-
भारत सरकारला गरीब लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्ना च्या बाबतीतील चिंता वाटते. म्हणूनच त्यांना राष्ट्रीय पेन्शन पद्धती (NPS) सहभाग घेण्यास उद्युक्त करत आहोत. असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुषी आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून या असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृतीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्यासाठी उद्युक्त करायचे आहे.

२०११- १२ च्या ६६ व्या फेरीत असे निष्पन्न झाले आहे कि असंघटीत कार्यशेत्रातील कामगार हा संपूर्ण कामगारांच्या ८८% आहे म्हणजे ४७.२९ करोड आहे आणि त्यांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. २०१५-१६ च्या वार्षिक अर्थसंकल्पात सरकारने सर्वाना सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन सर्व भारतीयांसाठी जाहीर केली आहे.
अटल पेन्शन योजना ज्यात सर्वाना काळ आणि त्यांची वर्गणी नुसार पेन्शन मिळणार आहे. अटल पेन्शन या योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील सर्व नागरिकांना पेन्शन देण्याचा भर असेल. अटल पेन्शन योजना यात वर्गणी दाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात १००० रुपये. २००० रुपये. ३००० रुपये ४००० रुपये. ५००० रुपये ची कायम स्वरूपी वयाच्या ६० व्या वर्षापासून पेन्शन मिळेल.
वर्गणी हि अटल पेन्शन योजनेत सामील होण्याच्या वयावर अवलंबून असेल. या योजनेत सामील होण्याचे कमीत कमी वय १८ वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे ४० वर्ष असेल. वर्गणीदाराने कमीतकमी वीस वर्ष या योजनेत रुपये भरले पाहिजेत. ठराविक रकमेच्या पेन्शन ची हमी सरकारने घेतली आहे. अटल पेन्शन योजना हि १ जून २०१५ पासून कार्यान्वित आहे.
अटल पेन्शन योजनेचे फायदे:-
- जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात पासून वर्गणी भरत आहे. त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायम स्वरूपी १००० ते ५००० रुपये प्रती माह पेन्शन वर्गणीदारांना मिळेल.
- जेवढा वर्गणीदार लवकर योजनेत सामील होईल त्याची वर्गणी कमी राहील आणि वर्गणी कमी राहील आणि वर्गणी वयानुसार वाढत जाईल.
- तसेच वारसदाराला १.७ लाख रु ते ८.५ लाख रु एकरकमी लाभ मिळणार आहे.
- यामुळे वृद्धपकाळात नागरीकांना त्याचा फायदा होईल.
अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये:-
१. प्रामुख्याने असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना अटल पेन्शन योजना लाभ मिळवून देणे.
२. वयाच्या ६० वर्षानंतर भारत सरकारकडून प्रतिमहिना किमान मासिक पेन्शन मिळण्याची हमी.
३. अटल पेन्शन योजनेमध्ये भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
४. ग्राहक कोणतीही बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसद्वारे या योजनेत सामील होऊ शकतो.
५. बचत बँक खात्यातून स्वयंडेबिट सुविधेद्वारे मासिक किंवा त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर योगदान दिले जाते.
अटल पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता:-
- भारताचे नागरिक असले पाहिजे.
- वय १८-४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कमीतकमी २० वर्षे योगदान दिले पाहिजे.
- आपल्या खात्यासह बँक खाते लिंक केले जावे.
- एक वैध मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
- जे स्वावलंबन योजनेचा लाभ घेत आहेत ते आपोआपच अटल पेन्शन योजनेस पात्र होतील.
अटल पेन्शन योजने ची महत्त्वाची कागदपत्रे:-
१. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
२. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
३. अर्जदाराचे बँक खाते असावे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.
४. अर्जदाराचे आधार कार्ड
५. मोबाईल नंबर
६. ओळखपत्र
७. कायम पत्त्याचा पुरावा
८. पासपोर्ट आकाराचा फोटो
अटल पेन्शन योजनेअंतर्गत योगदान न देण्याची स्थिती:-
जर अर्जदाराने अटल पेन्शन योजनेत योगदान दिले नाही तर त्याचे खाते ६ महिन्यांनंतर गोठवले जाईल. यानंतरही गुंतवणूकदाराने कोणतीही गुंतवणूक केली नसेल तर १२ महिन्यांनंतर त्याचे खाते निष्क्रिय केले जाईल आणि २४ महिन्यांनंतर त्याचे खाते बंद केले जाईल. अर्जदाराने वेळेवर पेमेंट न केल्यास त्याला दंड भरावा लागेल. हा दंड दरमहा ₹१ ते ₹१० पर्यंत असतो.
अटल पेन्शन योजना अर्ज कसा करावा:-
१. सर्व राष्ट्रीयीकृत बँका योजना देतात. आपले अटल पेन्शन योजना खाते सुरू करण्यासाठी आपण यापैकी कोणत्याही बँकांना भेट देऊ शकता.
२. अटल पेन्शन योजनेचे फॉर्म ऑनलाईन आणि बँकेत उपलब्ध आहेत. आपण अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता.
३. हे फॉर्म इंग्रजी, हिंदी, बांगला, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ आणि तेलगू भाषेत उपलब्ध आहेत.
४. अर्ज भरा आणि तो आपल्या बँकेत जमा करा.
५. आपण आधीपासून बँक प्रदान केली नसेल तर वैध मोबाइल नंबर द्या.
६. आपल्या आधार कार्डची छायाप्रत सादर करा.
७. आपला अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला एक पुष्टीकरण संदेश पाठविला जाईल.